Pages

Daina Kadambari | दैना कादंबरी




पारधी समाज विकासाचा तरुणांचा संकल्प

पुणे - अंधश्रद्धा, अस्वच्छता, अज्ञान यामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्‍न; तसेच समाजातील महिलांना मिळणारी अमानवी वागणूक अशा विचित्र परिस्थितीत पारधी समाज वाटचाल करत आहे. शिक्षण आणि रोजगारापासून कोसो दूर असणाऱ्या या समाजाला सुधारायचे असेल, तर प्रत्येक गावाने किमान एका कुटुंबाचा विकास केला पाहिजे, असे कळकळीचे आवाहन या समाजामध्ये सुधारणा घडवू पाहणाऱ्या नामदेव भोसले या सृजनशील तरुणाने केले आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्र आदिवासी पारधी संघटनेचे अध्यक्ष म्हणून भोसले काम करतात. त्यांचे बंधू भास्कर यांनी लेखणीच्या माध्यमातून या समाजाचे दुःख, अंधश्रद्धा याला वाचा फोडली आहे. निधर्मी, ऋतुप्रीत हे कवितासंग्रह, "दैना' या कादंबरीनंतर भास्कर यांचे "वेदना' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. नामदेव भोसले विविध गावात जाऊन ही पुस्तके पोचवतात आणि जागृती घडविण्याचा प्रयत्न करतात. 

पारधी समाजात आजही कमालीची अंधश्रद्धा आहे, असे नामदेव भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, ""पोलिसांना घाबरून पारधी लोक गावापासून दूर राहतात. गावात मिसळल्याशिवाय शिक्षण, सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. समाजातील 80 टक्के कुटुंबे चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात; पण अंधश्रद्धा त्यांची पाठ सोडत नाही. प्रत्येक कुटुंब गुढीपाडवा व दिवाळीदरम्यान देवदेव करते. काळे, भोसले, चव्हाण बोकडांचा; तर शिंदे, पवार टोणग्याचा बळी देतात. असे बोकड किंवा रेड्यावर महिलांची सावली पडणेही पाप मानले जाते.'' 

समाजाबाहेर याबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे कोणी लक्ष देत नाही. या गोष्टी जगासमोर आल्या तर सुधारणांसाठी प्रयत्न केले जातील, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""आदिवासींसाठी सरकार लाखो रुपयांचा निधी देते; पण आमच्यापर्यंत काहीच पोचत नाही. जातीचे दाखले काढायला 50 वर्षांचा पुरावा मागितला जातो; पण आमच्याकडे 10 वर्षांचासुद्धा शिक्षणाचा दाखला नाही. गुन्हेगारीचा इंग्रजांनी मारलेला शिक्का अजूनही पुसला नाही. पुणे जिल्ह्यात 27 ते 28 हजार कुटुंबे असूनही केवळ 700 ते 800 कुटुंबांचीच रहिवासी म्हणून नोंद असेल.'' 

आईने दिली प्रेरणा... गुन्हा नसतानाही वडिलांना 10-12 वेळा तुरुंगवास भोगावा लागला, असे सांगून भोसले म्हणाले, ""वडिलांना जामीन मिळविण्यासाठी आई सगळ्यांसमोर हात पसरायची; पण कोणी मदत केली नाही. एकदा पोलिसांनी आईलाच जोरात मारले. त्या वेळी तिने फोडलेली किंकाळी अजूनही मनातून जात नाही. समाजात जगायचे तर प्रतिष्ठा पाहिजे, त्यासाठी शिकले पाहिजे, हे स्वप्न आईने दाखवले. तिचे कष्ट कमी होण्यासाठी शिकलो. शिक्षण अर्धवट राहिले तरी समाज सुधारला पाहिजे म्हणून काम करत आहोत.''

State Government Initiative

Please get in touch with concern for regular follow up about this budget


AYUSH | adivasi Yuva shakti


Join AYUSH group at  : www.facebook.com/groups/adivasi/

Namaskar Friends!
Welcome to AYUSH group, the group of tribal intellectuals. Aim to establish knowledge pool & skill sharing mechanism using social networking. Our objective is to create social awareness & tribal empowerment. 
Let us establish connections between experts & youngsters for sharing views & information. Let us utilize our valuable time for tribal development activities. Let us do it together!

Our Prime Objective:
§  Educational & career success
§  Tribal Empowerment
§  Tribal Culture & tradition preserve
§  Integrity in Tribal community

Online Link :
§  Home Page : www.adiyuva.in
§  Online Membership Form : www.join.adiyuva.in
§  Let us do it together : www.do.adiyuva.in

Social Networking  :
§  Facebook : www.facebook.com/adiyuva
§  You Tube Chanel : www.youtube.com/adiyuva


With the  help of social network, connect the professionals & students among rural & urban area. Let us connect online tribal population and let us share views on tribal development. This is initial stage of tribal unity, Tribal community is family. You may google us by “adiyuva”. Expecting your move for our community

Thanks & regards
AYUSHonline team
Author @ Google

Paradhi Adivasi

Details coming soon

पारधी समाजासाठी राज्यात 900 घरे

सोलापूर - पारधी समाजासाठी शासनाच्या वतीने राज्यात 900 घरे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज येथे दिली. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेत आयोजिलेल्या बैठकीसाठी ते आले होते. आमदार विजय देशमुख, आमदार दिपक साळुंके या वेळी उपस्थित होते. बैठकीनंतर श्री. ढोबळे यांनी ही माहिती दिली. 

श्री. ढोबळे म्हणाले, 'या योजनेसाठी वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात 80 ते 90 घरे बांधण्यात येणार आहेत. माढा तालुक्‍यात काही दिवसांपूर्वी पारधी समाज वस्तीतील घरे जाळण्याचा प्रकार झाला होता. त्या घटनास्थळीही भेट दिली आहे. नव्वद टक्के लोकांना सुखाने जगायचे असेल तर विचलित असलेल्या दहा टक्के विचलित लोकांची व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. त्यानुसारच हे धोरण आखण्यात आले आहे.'' 
""राज्यातील 41 तालुक्‍यांत 897 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्व बाजूंनी पाण्याची कमतरता होत आहे. त्यामुळे रोज शंभर हापसे बंद पडत आहेत. सध्या असलेल्या टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या आदीत आणखीन भर पडण्याची शक्‍यता आहे. जुलैअखेरपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत'', असेही श्री. ढोबळे यांनी सांगितले. 

चिमणीचे भान ठेवा... टंचाईचा फटका फक्त माणसालाच नाही, तर पशुपक्ष्यांनाही बसला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गच्चीवर पशुपक्ष्यांसाठी एखाद्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. चिमणीच्या पिलाची चोच पाण्यावाचून रिकामी राहू नये, याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन श्री. ढोबळे यांनी या वेळी केले.

Original at : http://www.esakal.com/esakal/20111126/4743701803651548283.htm

पारधी- कातकऱ्यांना मिळणार हक्काचा निवारा

सातारा - दुर्लक्षित राहिलेल्या पारधी कातकरी समाजाला आता हक्काचा निवारा मिळणार आहे. पारधी- कातकरी पुनर्वसन योजनेत जिल्ह्यातील 221 कुटुंबांना प्रत्येकी एक गुंठे जागा देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये पाच तालुक्‍यांतील 137 पारधी कुटुंबे, तसेच चार तालुक्‍यांतील 84 कातकरी कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे.

स्वातंत्र्यानंतरही देशातील काही जाती जमाती आजही मागासलेपणाने वावरत आहेत. अशा मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी राज्य व केंद्र शासनाने विविध योजनांद्वारे कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे असले, तरी आजही पारधी- कातकरी समाज दुर्लक्षित आहे. केवळ कायमस्वरूपी राहण्याचे ठिकाण नसल्याने या समाजातील लोकांना आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही. डोक्‍यावर हक्काचे छप्पर नसल्याने आयुष्यभर इकडून तिकडे भटकंती करत हा समाज वावरत असतो. त्यातच भर म्हणजे गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने समाजाकडून हेटाळणी होते. त्यामुळे आजही या समाजाचा विकास झालेला नाही. पारधी मुक्ती आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याशी संपर्क साधून सांगलीप्रमाणे सातारा जिल्ह्यात पारधी आणि कातकरी कुटुंबांना ते राहात असलेल्या ठिकाणी एक गुंठा जागा देण्याची मागणी केली होती. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देत पारधी- कातकरी पुनर्वसन योजनेतंर्गत प्रत्येक कुटुंबांना जागा देण्यास मान्यता दर्शवत तसा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांमार्फत महसूल व वन विभागाकडे पाठविला आहे. 

या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर आदिवासी विभागाकडून विशेष घटक योजनेसह विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील सातारा, फलटण, खटाव, खंडाळा आणि माण या पाच तालुक्‍यांत 137 पारधी कुटुंबे आहेत, तर जावळी, सातारा, पाटण आणि खंडाळा या चार तालुक्‍यांत 84 कुटुंबे कातकरी समाजातील आहेत. या सर्व 221 कुटुंबांना आता एक गुंठे जागा मिळणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी पारधी- कातकरी समाजातील कुटुंबे ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना तत्काळ ग्रामपंचायत अथवा ते राहात असलेल्या ठिकाणी नमुना आठला नोंद करून त्यांना उतारे द्यावेत, असे आदेश दिले आहेत. येत्या आठवडाभरात ही कार्यवाही पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

सर्वाधिक लाभ फलटण तालुक्‍याला
या योजनेचा लाभ सातारा तालुक्‍यातील 16 पारधी कुटुंबांना होणार आहे, तर सर्वाधिक लाभ फलटण तालुक्‍यातील 78 पारधी कुटुंबांना होणार आहे. त्याबरोबर खटाव 23, माणमधील 14 कुटुंबांना लाभ होणार आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतील 137 पारधी कुटुंबांना एक गुंठेप्रमाणे जागा मिळणार आहे, तसेच चार तालुक्‍यांत 84 कातकरी समाजाची कुटुंबे असून, पाटणमध्ये सर्वाधिक 33 कुटुंबे आहेत, तसेच खंडाळा 32, सातारा 13, जावळीत सहा कुटुंबे आहेत. या सर्वांना हक्काचा निवारा मिळणार आहे.

Original at : http://www.esakal.com/esakal/20091219/5102161608786534411.htm

Save Nature Save Ourselves!

Save Nature Save Ourselves!

Reach us @Facebook

Reach us @G+

Daina - Kadambari